मंडळ परिचय
स्थापना : विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून संस्थेची स्थापना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर १९५४ साली सात शाळकरी विद्यार्थ्यांनी केली.
दृष्टिकोन : गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांचा सर्वांगीण विकास घडविणे हा व्यापक विचार संस्थेने अंगिकारला आहे.
ध्येयधोरण : सुजाण, समृध्द व सुसंस्कृत नागरिकांची पिढी घडविणे. स्वामी विवेकानंदाना अभिप्रेत असणारा सुदृढ, निकोप व जाज्वल्य देशप्रेम असलेला समाज निर्माण करणे. जात, धर्म, व राजकारण यापासून अलिप्त राहून कार्य करणे.
कार्यक्षेत्र : मध्य मुंबईतील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणारया चिंचपोकळी, सातरस्ता, भायखळा, लालबाग व ना.म.जोशी या विभागात संस्थेचे प्रामुख्याने कार्य चालते.
सदस्यत्व : इयत्ता ५ वी व त्यापुढील शिक्षण घेणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यास संस्थेचा सभासद होता येते. केवळ एक रुपयात आजीव सभासदत्व देणारी ही एकमेव संस्था. कोणत्याही जाती धर्माच्या विद्यार्थ्यास सभासद होण्याची मुभा आहे.
सदस्य परिवार : आजमितीस संस्थेचे १४,००० हून अधिक सभासद आहेत. यापैकी अनेक जण पदवीधर, उच्चशिक्षित असून डॉक्टर, प्राध्यापक, वकील अभियंते, पत्रकार, कला वा क्रीडा इत्यादि क्षेत्रात कार्यरत आहेत.
अधिक...
माहिती पट